समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी न्यू सरस्वती फाउंडेशनतर्फे नियमित राबवले जाणारे उपक्रम.
ग्रामीण भागातील गरजू ५००+ विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मोफत वह्या, पुस्तके, गणवेश व कंपास पेटी वाटप.
तज्ज्ञ फिजिशिअन, नेत्रतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत मोफत तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन व मोफत चष्मे वाटप.
रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून दरवर्षी २००+ बाटल्या रक्त संकलित करणारी महाशिविर मोहीम.
शाळा, स्मशानभूमी व रस्त्यांच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुनिंब व आंबा अशा ५००+ देशी झाडांची लागवड व संगोपन.
ग्रामीण महिलांना ३ महिन्यांचे विनामूल्य शिवणकाम, हस्तकला व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे.
शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धती, जीवामृत निर्मिती व माती परीक्षण मार्गदर्शन.